AIU National Vice Chancellors Meet : राष्ट्रीय कुलगुरू महासभेचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते उद्घाटन

AIU National Vice Chancellors Meet

‘विकसित भारत २०४७’ साठी नवोपक्रम, संशोधन आणि सर्वसमावेशक शिक्षण अत्यावश्यक; विद्यापीठांनी नोकरी निर्माण करणारे युवक घडवावेत पुणे – AIU National Vice Chancellors Meet :  देशाला २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडविण्यासाठी नवोपक्रम, संशोधन आणि सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्था अत्यावश्यक असून या माध्यमातून विकासाचे लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा … Read more

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू; घाटातील ट्रॅफिक आणि अपघातांना मोठा दिलासा

Mumbai Pune Expressway

१०.५ किमीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे प्रवास ३० मिनिटांनी कमी, टोलवाढ नाही; उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांची पाहणी मुंबई – Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी … Read more

Women Reservation Bill Implementation : महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी संसदेचे विशेष अधिवेशन; समान प्रतिनिधित्वाचा नवा टप्पा

Women Reservation Bill Implementation

डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विधान; “३० वर्षांनंतर महिलांना राजकारणात न्याय्य संधी”; घटनादुरुस्तीमुळे स्पष्ट होणार आरक्षणाचे स्वरूप मुंबई – Women Reservation Bill Implementation: राज्यातील महिला सुरक्षेशी संबंधित शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून महिलांना तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. भरोसा सेल, … Read more

Chandrashekhar Bawankule : लोणीकंद येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातील समाधान शिबिराचे उद्घाटन

*छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत समाधान शिबाराचे महसूलमंत्र्यांच्या हस्ते लोणीकंद येथे उद्घाटन* *'विकसित भारत-२०४७' च्या संकल्पपुर्तीकरिता शासन प्रयत्नशील-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे* ◾*शासनाचे नागरिकांच्या कल्याणाकरिता लोकाभिमूख, गतिमान आणि पारदर्शक निर्णय* पुणे, दि.१३ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 'विकसित भारत-२०४७' करण्याच्या संकल्प करण्यात आलेला आहे; 'विकसित महाराष्ट्राच्या' माध्यमातून या संकल्पपुर्तीच्यादृष्टीने समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी राज्य शासन विविध लोककल्याणकारी योजना राबवित आहे. त्याअनुषंगाने राज्यशासनाच्यावतीने लोकाभिमूख, गतिमान आणि पारदर्शक निर्णय घेण्यात येत आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत लोणीकंद येथे आयोजित समाधान शिबारात ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत, उप विभागीय अधिकारी यशवंत माने, अपर तहसीलदार तृप्ती कोलते पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप कंद, जिल्हा परिषदेचे सदस्य किरण साकोरे, हवेली पंचायत समिती सभापती युवराज काकडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. श्री. बावनकुळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शी प्रशासन होते, या त्रिसुत्रीची प्रेरणा घेऊन अभियानाला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर असे नाव दिले आहे. या शिबीरात जवळपास २० गावांचा यामध्ये समावेश आहे. वेगवेगळ्या विभागाच्या ४५ सेवा उपलब्ध करुन देण्यात आहेत, येत्या काळात सर्व सामान्य नागरिकांच्या आयुष्यात बदल घडविण्यास मदत होणार आहे. आगामी काळातही अशा प्रकारचे शिबीराचे आयोजन करावे. या शिबाराच्या माध्यमातून राज्यामध्ये पहिल्या टप्प्यात ४० हजार फेरफार दुरुस्ती, २० हजार सातबारा दुरुस्ती, १ लाख ५० संगणकीकृत सातबाऱ्याचे वाटप, ७५ हजार ८ अ नोंदीचे वाटप, १ लाख ७५ हजार विविध प्रकारचे प्रमाणपत्राचे वाटप, ३४ हजार एक खिडकी योजनेच्या माध्यमातून प्रमाणपत्र वाटप, २ हजार कमी जास्त पत्रक तयार केले, ५०० गावातील दस्तावेज दुरुस्ती करण्यात आले आहे, पुणे जिल्ह्यात १३ हजार ३३ दाखल्याचे वितरण करण्यात आले. एकूणच सुमारे ५ लाख परिवाराला शिबाराचा लाभ देण्यात आला असून खऱ्या अर्थाने मागील दोन महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला साजेसं काम राज्य शासनाच्यावतीने केले आहे. नागरिकांच्या जीवनात महसूल आणि गृहखात्याचे महत्वाचे आहेत, त्यादृष्टीने इतरखातेही पुढे नेण्याचे काम सुरु आहे. २५ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे अधिकाराचे विकेंद्रीकरण करून राज्यातील एकही नागरिक बेघर राहणार नाही, याबाबत नियोजन करण्यात आले आहे. बाजार मूल्य भावामध्ये वाढ न करण्याचा निर्णय, खासगी सर्व्हरची नेमणूक, भुमि अभिलेख अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समोवश, शेतजमीन अकृषक करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यात आली आहे. महसूल विभागातील पदोन्नतीचा विषय मार्गी लावण्यात आला. महसूल विभागाला बळकटीकरण करण्याच्यादृष्टीने महसूल विभाग, नोंदणी व मुंद्राक विभाग आणि भुमि अभिलेख विभागाचा आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता हवेली तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये वेगळी ग्रामसभा घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन केले. हा निर्णय राज्यात लागू करुन ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा लागू करण्यात येईल. या योजनेच्या माध्यमातून येत्या ५ वर्षात सर्व शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यात येणार आहे. येत्या काळात 'पीएमआरडीए' क्षेत्रात तुकडेबंदी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत लवकरात लवकर बैठक घेवून सूचना देण्यात येईल. भामा-आसखेडसंदर्भात शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर असलेली शेरे कमी करण्याबाबत लवकरच पुनर्वसन मंत्री, विभागीय आयुक्त यांच्यासोबत बैठक घेवून निर्णय घेण्यात येईल. देवस्थानाच्या नावे असलेल्या इनाम जमिनीबाबत येत्या अधिवेशनात कायदा करण्यात येईल. हवेली तालुक्यातील लोणीकंदला स्वामित्व योजनेत आणून भूमिअभिलेख विभागाच्यावतीने ड्रोन सर्वेक्षण करण्यात करावे आणि मालमत्ता पत्रक आणि सनद देण्यात यावे. याकरीता खासगी सर्व्हर तातडीने नेमणूक करुन गतीने मोजणी करावी. लोकोपयोगी कामे करण्यासाठी सलोखा योजनेमध्ये १५० हेक्टर जागेचा प्रस्ताव तयार करुन सादर करावा, याप्रस्ताव जमीन देण्यात येईल. ग्रामपंचायतीने लोकोपयोगी कामांबाबत महसूल विभागाकडे सादर करावे, त्यासही मंजुरी देण्यात येईल. कार्यक्रमात मागणी केलेल्या मागण्यांचा सकारात्मक विचार करुन अडीअडचणी सोडविण्यात येईल, असेही श्री. बावनकुळे म्हणाले. नागपूर जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या नवसखी योजनेअंतर्गत २ हजार २०० महिला बचत गटांना एक लाख रुपये फिरते भांडवल देण्यात येत आहे. याप्रमाणे अशा प्रकारची योजनांची पुणे विभागात अंमलबजावणी करण्याची विभागीय आयुक्तांना मंत्री श्री. बावनकुळे यांनी सूचना केली. डॉ. पुलकुंडवार म्हणाले, महसूल विभाग शासनाचा कणा म्हणून ओळखले जाते. आपत्तीच्या काळात सर्व संबंधित विभागाना सोबत घेवून नागरिकांना दिलासा देण्याचे कामे करण्यात येते. नागरिकांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यतची सर्व प्रकारचे दस्ताऐवज महसूल विभागाशी निगडित आहे. त्यामुळे नागरिकांचे जीवनमान सुखकर व्हावे, त्यांना जलदगतीने सेवा देण्याकरिता गेल्या काळात विभागाच्यावतीने विविध क्रांतीकारी आणि लोकाभिमुख निर्णय घेण्यात आले आहेत. नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यासह योजनांची माहिती होण्यासाठी अशा प्रकारचे शिबीरे उपयुक्त आहेत. जिल्ह्यात मतदार यादी विशेष पुनःरीक्षण कार्यक्रम, भारतीय जनगणना-२०२६, शेतकरी ओळखपत्र काढण्याच्या कामात नागरिकांनी सक्रीयपणे सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. पुलकुंडवार यांनी केले. श्री. राऊत यांनी महाराजस्व अभियानाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दिल्याबद्दल विभागाच्यावतीने कृतज्ञता व्यक्त केली. श्री. कंद म्हणाले, हवेली तालुक्यात मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनांची कामे प्रगतीपथावर आहे. ही योजना यशस्वी करयाकरिता लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मिळून जोमाने कामे करण्यात येत आहे.महसूल विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सेवांबाबत समाधान व्यक्त करत येत्या काळात तालुक्यातील नागरिकांच्या अडीअडचणी मार्गी लावण्याची सूचनाही श्री. कंद यांनी केल्या. श्री. साकोरे यांनी आपले विचार व्यक्त केले. श्री. माने यांनी प्रास्ताविकात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत आयोजित समाधान शिबीरात हवेली उप विभागात देण्यात आलेल्या लाभाबाबत माहिती दिली. नियमित कामे करण्यात महसुली उद्दिष्ट पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. आगामी काळातही यापुढेही अशाच प्रकारचे कामे नागरिकांना सेवा देण्यात येईल, असेही श्री. माने म्हणाले. कार्यक्रमात महसूल विभागाचा आकृतिबंध मंजूर केल्याबद्दल मंत्री श्री. बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला. श्री. बावनकुळे यांच्या हस्ते मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना प्रातिनिधिक स्वरुपात लॅपटॉपचे वितरण करण्यात आले. तसेच महसुली सेवांची माहिती देणाऱ्या क्यूआर कोडचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी श्री. बावनकुळे यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या स्टॉल भेट देवून माहिती घेतली. Chandrashekhar Bawankule

‘विकसित भारत-२०४७’ साठी राज्य शासन कटिबद्ध; ४५ महसुली सेवा, हजारो दाखले वितरण व नागरिकांच्या अडचणी सोडविण्याचा निर्धार पुणे – Chandrashekhar Bawankule : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित भारत-२०४७’ करण्याच्या संकल्प करण्यात आलेला आहे; ‘विकसित महाराष्ट्राच्या’ माध्यमातून या संकल्पपुर्तीच्यादृष्टीने समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी राज्य शासन विविध लोककल्याणकारी योजना राबवित आहे. त्याअनुषंगाने राज्यशासनाच्यावतीने लोकाभिमूख, गतिमान … Read more

Baner Pashan Link Road traffic : बाणेर पाषाण लिंक रोडवरील पासपोर्ट सेवा केंद्रामुळे वाहतूक समस्यांचा प्रश्न ऐरणीवर

Baner Pashan Link Road traffic

नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकाराने प्रशासन, पासपोर्ट अधिकारी व नागरिकांची संयुक्त बैठक; मास्टर प्लॅन तयार करण्याचा निर्णय पुणे – Baner Pashan Link Road traffic : शहरातील बाणेर पाषाण लिंक रोड येथे नव्याने सुरू झालेल्या पासपोर्ट सेवा केंद्रामुळे निर्माण होत असलेल्या वाहतूक कोंडी, पार्किंग, अतिक्रमण व परिसर वाहतूक व्यवस्थापनाच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी नगरसेवक सनी विनायक … Read more

uterus removal surgery Maharashtra : गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियासंदर्भात राज्यस्तरीय समितीची बैठक पडली पार

uterus removal surgery Maharashtra

गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियासंदर्भात जिल्हास्तरीय समित्यांचे स्वरूप तयार करण्याचा निर्णय- डॉ.नीलम गोऱ्हे; ऊसतोड महिला कामगारांमध्ये आरोग्यविषयक व्यापक स्वरूपात जनजागृती करण्याचे निर्देश पुणे – uterus removal surgery Maharashtra : राज्यशासनाने गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियासंदर्भात राज्यस्तरीय समिती पुर्नगठीत करण्यात आली आहे, या समितीचे कामकाज अधिक गतीने तसेच प्रभावीपणे होण्यासाठी लवकरात लवकर जिल्हास्तरीय समित्यांच्या कामाचे स्वरूप लवकरच ठरविण्याचा … Read more

Kothari Builder Pune : खराडी मधील घरखरेदीदरांचे भर उन्हात धरणे आंदोलन

Kothari Builder Pune

दहा दिवसात घराचा ताबा मिळाला नाही, तर आत्मदहन करण्याचा इशारा; आमदार बापूसाहेब पठारे यांचा पाठिंबा पुणे – Kothari Builder Pune : निर्धारित वेळेत घराची ९५ टक्के रक्कम देऊनही गेल्या दोन वर्षांपासून घराचा ताबा दिला जात नाही. याबाबत महारेरा आणि पोलीस प्रशासनाकडे दाद मागितली असता, कारवाई करण्यात टाळाटाळ होत आहे. कष्टाच्या पैशातून हक्काचे घर घेण्याचे स्वप्न … Read more

Mathuratai Rehabilitation Chandrapur : मथुराताई पुनर्वसनाला वेग; उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

Women Reservation Bill Implementation

उपसभापती Dr. Neelam Gorhe यांचा आढावा; घरकुल ८०% पूर्ण, आर्थिक व रोजगार सहाय्याला गती मुंबई – Mathuratai Rehabilitation Chandrapur : नवरगाव (जि. चंद्रपूर) येथील मथुराताई यांच्या पुनर्वसन प्रकरणाचा आज विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सविस्तर आढावा घेतला. ११ डिसेंबर २०२५ रोजी त्यांनी प्रत्यक्ष भेट देत प्रशासनाला दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी समाधानकारकपणे सुरू असल्याचे दिसून आले … Read more

Republican Party National Status : रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून देणार – रामदास आठवले

Republican Party National Status

चार राज्यांत निवडणूक लढवणार; पक्ष विस्तारासाठी पोर्ट ब्लेअर व पुण्यात बैठकींचे नियोजन पुणे – Republican Party National Status : रिपब्लिकन पक्षाला सर्वसमावेशक स्वरूप प्राप्त करून देऊन राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवून देण्याचा निर्धार आठवले गटाचे प्रमुख व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकींपैकी चार राज्यात रिपब्लिकन पक्ष … Read more

Bhagat Singh : भगतसिंह केवळ क्रांतिकारक नव्हे, तर प्रेरक विचार व वृत्ती

Bhagat Singh

Bhagat Singh : विचारवंत किरणजितसिंह यांचे प्रतिपादन पुणे प्रतिनिधी  पुणे – Bhagat Singh : भगतसिंह हे केवळ देशासाठी हुतात्मा झालेल्या क्रांतिकारकाचे नाव नाही; तर भगतसिंह हा एक विचार व वृत्ती आहे. स्वातंत्र्यासाठी, श्रमजीवींसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि शोषितांसाठी लढणारा, संघर्ष करणारा विचार म्हणजे भगतसिंह आहे. त्यामुळे आज शरीररूपाने भगतसिंह नसले, तरी विचाररूपाने ते आजही प्रेरणादायी आहेत,” असे … Read more